प्राचीन काळापासून प्रबोधनाचा विचार देणारी मराठी भाषा संस्कृतीचा कणा आहे.- प्रा. डॉ. जतिन मेढे

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा दि. २७ – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील मराठी विभागाद्वारे २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. शिरीष बी. पाटील होते, तर प्रमुख वक्ते कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद ता. यावल जि. जळगाव येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे हे होते. वरणगाव महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रा. डॉ. एस. के. बच्छाव, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शरद बी. पाटील यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी आपल्या मनोगतातून संविधानिक तरतुदीमधून मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात भाषेचा दर्जा विषद केला. लीळाचरित्र, विवेकसिंधू, ज्ञानेश्वरी, भारुड, तुकारामांच्या गाथांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय भाषेपर्यंत आणि छत्रपती शिवरायांच्या भाषेपासून नुकत्याच झालेल्या दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या मराठी भाषेपर्यंत ही सर्व ‘माय मराठीची गौरवगाथा’ आपल्या शब्दात व्यक्त केली. मराठी केवळ भाषा नसून प्राचीन काळापासून प्रबोधनाचा विचार महाराष्ट्राच्या मातीत आणि मनामनात पेरण्याचे काम मराठी भाषेने केले असल्याने, ती आमचा वैचारिक आणि सांस्कृतिक कणा आहे. तोच वारसा आपल्या तमाम मराठी साहित्यिकांनी रुजवला आहे. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब यांचे साहित्यातून तोच विचार आणि वारसा मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित करतात. संत महात्म्यांपासून तर आत्तापर्यंत साहित्यिकांनी केलेले कार्य अनमोल ठरते. कुसुमाग्रजांच्या साहित्यातून देखील मराठी बाणा पुढे जाताना दिसतो. सर्वच साहित्यिकांचे साहित्य मानवी जीवन सुखकर करण्यासाठी आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य मा. डॉ. शिरीष बी. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मराठीला प्रगल्भ करण्यासाठी तिचे वाचन व लेखन नियमितपणे करणे आवश्यक आहे. कवितेतून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडत मराठीची गौरवगाथा आपल्या शब्दात व्यक्त केली.यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने कविवर्य तात्यासाहेब वि. वा. शिरवाडकरांच्या ग्रंथांचे ‘ग्रंथ प्रदर्शन’ लावण्यात आली होते. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकनेते स्व. अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यात वक्तृत्व स्पर्धेत कु. रोशनी दिलीप परदेशी – प्रथम, कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर – द्वितीय, कु. चेतना रणदीप हिरे – तृतीय तर निबंध स्पर्धेत कु. आरती राजेंद्र पाटील – प्रथम, कु. सायमा शफी सैय्यद – द्वितीय, कु. प्रियंका रोहिदास पाटील – तृतीय, कु. डिंपल दीपक कुमावत – उत्तेजनार्थ व कु. चांदनी सुदामा कोरी – उत्तेजनार्थ यांना पारितोषिक वितरित करून सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी डॉ. के. एस. इंगळे, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. माणिक पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. जयश्री वाघ, प्रा. सुनील पाटील, प्रा. लक्ष्मी गलाणी, श्री. विजय पाटील, विजय सोनजे, उमेश माळी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.

Related Articles

Back to top button