सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांचे विविध मागण्यांसाठी सोमवारी सोयगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

Social worker Sandeep Ingale's funeral procession in front of Soygaon Tehsil office on Monday for various reasons.

कार्यवाहीकडे महसूल विभागाचे तहसीलदार व पोलिस दुर्लक्ष!

आबा सूर्यवंशी
(सोयगाव जिल्हा संभाजीनगर )- सोयगाव तालुक्यात सर्रासपणे रात्री बेरात्री गौनखनिज चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूलचे भरारी पथक व पोलीस प्रशासन आर्थिक व्यवहारातून कारवाई करीत नसल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. बुडणारा महसूल अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून वसूल करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे दि.२४ सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी कि ,सामजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांनी वनविभाग,पंचायत समिती, पोलीस प्रशासन व महसूल भरारी पथक, उपविभागीय अधिकारी सिल्लोड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना भ्रमणध्वनीद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून तालुक्यात होत असलेल्या गौनखनिज चोरटी वाहतूक,जरंडी ग्रामपंचायत च्या ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी गौनखनिज वाहतुकीस दिलेले नाहरकत, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंधातून केलेला पंचनामा, वाळू माफियांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, पोलीस ठाण्यात विना रॉयल्टी ३५ते ४० ब्रास मुरूम टाकण्यात आला तहसीलदार यांना अर्ज देऊनही पंचनामा करण्यात आला नाही. जरंडी शिवार गट क्रमांक २९८ मध्ये चोरटी वाहतूक करून टाकण्यात आलेल्या मुरूमचा दबंग तलाठी महेंद्र वाडकर यांनी पंचनामा करून अहवाल तहसिल कार्यालयात दाखल केला त्यानुसार तहसीलदार यांनी नय्युम शहा हाजी पाशा शहा रा.ता.परळी जि.बीड हल्ली मुक्काम जरंडी ता.सोयगाव यांना चौदा लाख दोन हजार दोनशे रुपये दंडाची नोटीस दिली. मात्र दंड भरण्याची मदत देण्यात आली नसल्याने कारवाई संदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने वेळोवेळी तक्रार अर्ज देऊनही तहसीलदार यांनी चौकशी न करता कर्मचाऱ्यांची केलेली पाठराखण यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल सोयगाव तालुक्यात अधिकारी व माफियांच्या संगनमताने बुडविला जात आहे. जरंडी शिवारातील गट क्रमांक 298 मधील झाडे तोडण्याची परवानगी न घेताच तोडण्यात आली वनविभागाकडे तक्रार दिली मात्र काय कारवाई करण्यात आली याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून बुडालेला महसूल मासिक वेतनातून वसूल करण्यात यावा यासह वेळोवेळी दिलेल्या लेखी तक्रारी संदर्भात तहसीलदार यांनी काय कारवाई केली याबाबत तक्रारदारास अवगत करण्यात आले नसल्याने तहसीलदार व संबंधित अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी दि.१३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली होती यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी संबंधित प्रकरणाबाबत अद्यापही अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली नसल्याने दि.२४ सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे दि.१८ रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड हे चौकशी करून कारवाई करतात की राजकीय दबावाचे बळी पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button