पाचोरा-भडगाव कृऊबा समिति विरोधातील सर्व तक्रारी मागे घेत आहे! ॲड.अभय पाटील, तत्कालीन निष्ठावान संचालकांना दिलेला शब्द पाळला

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा-भडगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मागील १३ वर्षांपूर्वी तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार व अपहार याबाबत ॲड.अभय पाटील यांनी त्यावेळेचे सभापती, सह सुमारे ३५ संचालकां विरोधात पाचोरा न्यायालयात फौजदारी गुन्हे , औ.उच्च न्यायालयात रिट पीटिशन आणि सहकार मंत्रालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. झालेल्या चौकशीत संबंधितांवर गुन्हे दाखल झाले होते. सहकार विभागाने सर्व दोषी संचालकांच्या विरुद्ध वसुलीचे आदेश दिले होते. याबाबतची काही प्रकरणे आजही न्याय प्रविष्ट आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळातील काही संचालक हे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभे राहिले होते . आम्ही वैशाली त्यांचा प्रचार करतो तुम्ही आमच्याविरुद्धच्या तक्रारी मागे घ्या अशी मागणी केल्यावर मी त्यांना शब्द दिला होता तुम्ही त्यांचा प्रचार करा मी तुमच्याविरुद्धच्या सर्व तक्रारी आणि अर्ज माझ्या पातळीवर मागे घेईल. या मुद्द्यावर सदर संचालक ताईंच्या प्रचारात सक्रिय झाले होते. निवडणूक निकाल लागल्यावर आता जरी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांचा पराभव झाला असता तरी त्यांनी त्यांचे काम केले म्हणून आता मी दिलेला शब्द पाळत असून मी १३ वर्षांपूर्वी बाजार समिती विरोधातील केलेल्या सर्व तक्रारी मागे घेत असल्याची माहिती तक्रारदार ॲड.अभय पाटील यांनी दि.२१ रोजी सकाळी साडे अकरा वाजता उबाठा शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रसंगी बाजार समितीचे तत्कालीन सभापती शांताराम धनराज पाटील उर्फ बालू आण्णा उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना ॲड. अभय पाटील यांनी सांगितले की, सन २००९ ते सन २०१४ या दहा ते तेरा वर्षांच्या कालावधीत कृषि उत्पन्न बाजारात समितीत तत्कालीन व विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वात आलटून पालटून सत्ता होत्या. या कालावधीत काही तत्कालीन सभापती, संचालकांनी, तत्कालीन आमदार पुत्र, त्यांचे पठडीतील कार्यकर्त्यांनी खाजगी कामांसाठी,आणि विविध उपक्रम, दौरे दाखवून ,राजकीय पक्षांच्या जेवणावळी, मद्यपार्ट्या विविध बाबींसाठी बाजार समितीच्या पैशांची उधळपट्टी करत शेतकऱ्यांच्या पैशांचा गैरवापर केला, शेतकऱ्यांच्या जीवावर चालणाऱ्या बाजार समितीत अमाप खर्च करून आर्थिक अपहार आणि समितीचे आर्थिक नुकसान केले. मी एक जबाबदार नागरिक म्हणून त्या कार्यकाळातील पदांवर असलेले सभापती, संचालक मंडळा विरोधात पाचोरा न्यायालयात फौजदारी गुन्हा, औ.बाद. उच्च न्यायालयात रिट पीटिशन, सहकार मंत्रालयात कागदोपत्री पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याची दखल घेऊन विविध स्तरांवर चौकशी झाल्या नंतर संबंधित पदाधिकारी संचालकांवर सहकार विभागाने आर्थिक वसुलीची कारवाई केली होती, त्यांच्या खाजगी मालमत्तेवर बोजे बसवले होते, मी पाचोरा न्यायालयात त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना आरोपी करण्यात आले होते. त्या पैकी काही प्रकरणे आजही न्यायप्रविष्ठ आहेत. मी तक्रारी मागे घ्याव्यात म्हणून माझेवर आजी- माजी आमदारां कडून अनेक स्वरूपाचे दबाव आणि आर्थिक प्रलोभने दिली गेली, मात्र मी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी पडलो नाही. माझा न्यायालयीन लढा सुरूच ठेवला .विद्यमान आणि माजी आमदार हे राजकीय विरोधक असले तरी त्यांचे राजकीय सख्य आजही कायम आहे. यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकारी संघाची जमीन परस्पर विक्री झाली, बाजार समितीच्या जमिनी तुकडे तुकडे करून विक्री होत आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत असे आरोप ॲड. अभय पाटील यांनी केले. असे असतांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजार समितीचे तत्कालीन सभापती रावसाहेब पाटील आणि प्रताप हरि पाटील वगळता त्या काळातील बरेच संचालक हे महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पाठीशी राहिले आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रचारात सक्रिय राहिले. त्याच वेळी मी त्या माजी संचालकांना आश्वासित केले होते की , निकाल काही लागला तरी निवडणूक झाल्या नंतर मी मागील दहा वर्षांपूर्वी बाजार समितीच्या गैरकारभारा बाबत केलेल्या सर्व तक्रारी मागे घेईल . दिलेला शब्द मी आज पाळला आहे. या प्रसंगी बाजार समितीचे तत्कालीन सभापती बाळू पाटील हे देखील म्हणाले की आम्ही गेले कित्येक वर्ष माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सोबत होतो पण त्यांच्या सोबत आमचे राजकीय जीवन उध्वस्त झाले, प्रचंड त्रास सोसावा लागला असे वाईट दिवस कोणावरही येऊ नये. बोलण्यासारखे भरपूर काही आहे.

Related Articles

Back to top button