राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना पारितोषिक
आबा सूर्यवंशी
(प्रतिनिधि )-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भाषा अध्ययन प्रशाळा व संशोधन केंद्र, हिंदी विभाग आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ मार्च रोजी ‘राष्ट्रीय निबंध लेखन प्रतियोगिता’ व ‘स्वतंत्र काव्यपाठ प्रतियोगिता’ घेण्यात आली.
या स्पर्धेत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे (द्वितीय वर्ष – साहित्य) हिने काव्यवाचन स्पर्धेत ‘उठो द्रोपदी शस्त्र उठा लो’ ही हिंदी कविता सादर करुन प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. सायमा शफी सैयद (प्रथम वर्ष – साहित्य) या विद्यार्थिनीने राष्ट्रीय हिंदी निबंध लेखन स्पर्धेत ‘एकता और सांस्कृतिक गौरव की वैश्विक आवाज’ या विषयावर निबंध लिहून तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा.भाऊसाहेब दिलीप वाघ, मानद सचिव ॲड .महेश देशमुख, सुभाष तोतला तसेच संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.
या सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा.जयश्री वाघ उपस्थित होते. महाविद्यालय परिवाराकडून सदर विद्यार्थिनींचे या उत्तुंग यशाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.