महापुरुषांचा प्रेरणादायी इतिहास शाहिरांमुळेच जिवंत आ. किशोरआप्पा पाटील
नगरदेवळा येथे राज्यशाहीरी प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा / नगरदेवळा)-
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई तर्फे नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे दिनांक १७ मार्च ते २७ मार्च या दहा दिवसाच्या राज्यशाहिरी प्रशिक्षण शिबिराचा समारोप काल दिनांक २७ मार्च रोजी नगरदेवळा येथे संत सखाराम महाराज संस्थान सांस्कृतिक हॉल मध्ये सायंकाळी साडे सात वाजता संपन्न झाला.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, तहसीलदार विजय बनसोडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर पाटील ,पोलीस निरीक्षक श्री. दळवी शिवनारायण जाधव, अभिलाषा रोकडे, अविनाश कुडे सागर पाटील, रवींद्र पाटील ,शाहीर विनोद ढगे, शाहीर उत्तम गायकर, शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी माननीय किशोर आप्पा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतातून शाहिरी परंपरेचा इतिहास मांडताना उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना संबोधित केले की, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व शूरवीरांचा वारसा असलेल्या पराक्रमी महापुरुषांचे जीवन आणि त्यांचा रोमांचकारी संघर्ष आपल्या काव्यातून शाहिरांनी सातत्याने समाजासमोर डफ हातात घेऊन मांडलेला आहे. मरगळलेल्या समाजाला चेतना निर्माण करण्याचे कार्य केवळ शाहीर कलावंत करू शकतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील शाहिरांचे योगदान मोठ्या प्रमाणावर होते अलीकडच्या काळात शाहिरी लोककलेला नव संजीवनी देण्यासाठी समाजासोबत शासनाचा देखील सिंहाचा वाटा आहे रसिक प्रेक्षकांमुळे आणि शासनाच्या विशेष सहकार्यामुळे ही कला अधिकाधिक वृद्धिंगत होत जावी म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या शाहिरी प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे की भविष्यात ही कला संपवू नये. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी सांस्कृतिक विभागामार्फत नवनवीन विद्यार्थ्यांना शाहिरीचे प्रशिक्षण देण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकताअसल्याचे असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .कार्यक्रमांमध्ये एकूण ४८ विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित केले .बालकलावंतांनी दहा दिवसात घेतलेल्या प्रशिक्षणातून जे शिक्षण घेतले त्याचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांच्या समोर अतिशय उत्साहात सादर केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यासह विविध लोकगीते व पारंपारिक पोवाड्यांचा सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रसिक प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री एड, मा. ना. आशिष शेलार तसेच महाराष्ट्र राज्याचे व मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव तथा सांस्कृतिक विभागाचे सचिव श्री विकास खारगे व सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमात शाहीर विनोद ढगे यांनी देखील खानदेशातील शाहिरी परंपरा व महाराष्ट्रातील शाहीर परंपरेचा थोडक्यात अभ्यास आपल्या मनोगत आतून पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला. शिबिर संचालक शाहीर शिवाजीराव पाटील यांनी शाहिरी परंपरेच्या माध्यमातून बालकलावंतांना शिक्षण देणे का गरजेचे आहे आणि भविष्यात शाहीर घडवणे का गरजेचे आहे याचा उगवत्या शैलीत मसुदा मांडून उपस्थितांमध्ये शाहीर कलावंतांबद्दलची व शाहिरी लोककलेची माहिती उत्तम स्वरूपात देऊन उपस्थितांना कलावंत किती महत्त्वाचा घटक आहे असे आपल्या भाषणातून संबोधित केले.या प्रसंगी बालकलावंतांचे पोवाडे आणि लोकगीते सादर करण्यात आली तसेच राज्य गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाला नगरदेवळा आणि परिसरातील मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते सोबतच गावातील प्रतिष्ठित जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवनारायण जाधव, जेष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, सौरभ तोष्णीवाल, शैलेंद्र बिरारी, अविनाश कुडे सुरज राऊळ, भूषण पवार, कुणाल राऊळ, भागवत महाजन, नामदेव सोनवणे, सिताराम महाजन, रामसिंग राजपूत, राजेंद्र जोशी, जितेंद्र भांडारकर, गोकुळ पाटील, भूषण पवार, वेदराज कपाटे, दिगंबर पाटील, अशोक पाटील, मान्यवरांसह रसिक प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर जितेंद्र भांडारकर यांनी तर आभार प्रदर्शन गोकुळ पाटील यांनी मानले.