पत्रकार हा समाजाला आरसा दाखविणारा असतो,आ. किशोर आप्पा पाटील,पत्रकार वतीने सन्मान कार्यक्रमात व्यक्त केले मत

 

पाचोरा प्रतिनिधि)- पाचोरा येथे दि.४ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता शहराच्या बाजार समितीच्या समोरील नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापार भवनात मधुर खान्देश साप्ताहिक प्रथम वर्धापनदिन सोहळा आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हॅट्ट्रिक विजयाचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले, एमएसपी बिल्डकॉनचे युवा उद्योजक मनोज शांताराम पाटील, तालुका कृषि अधिकारी रमेश जाधव, संजय एरंडे, विकास पाटील नंदू सोमवंशी आदीं मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थोरपुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
प्रास्ताविकात मधुर खान्देश चे संपादक राहुल महाजन यांनी पत्रकारिता आणि साप्ताहिकाच्या वाटचाल बाबत माहिती दिली. तसेच मधुर खान्देश साप्ताहिक पत्रिकेचे अनावरण केले.
कार्यक्रमात प्रांताधिकारी श्री.अहिरे, शिवसेना प्रवक्ते श्री.देसले, पोलिस निरीक्षक श्री. पवार, जेष्ठ पत्रकार अनिल महाजन, लक्ष्मण आबा सूर्यवंशी, माजी नगरसेवक विकास पाटील यांनी पत्रकारांचे आचार -विचार, लिखाण, कर्तव्य, वागणूक, जनअपेक्षा यावर मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि सत्कारार्थी कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील अभ्यासू भाषणात म्हणाले की,
पत्रकार हा समाजाला आरसा दाखविणारा असतो मात्र तोच पत्रकार अनेक वेळा त्या आरश्यात आपले प्रतिबिंब हरवून बसतो. पत्रकारितेचा प्रवास खडतर आहे पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक प्रकारचे अनुभव येत असतात. त्यांना कोणताही पगार किंवा मानधन मिळत नाही , जाहिरातींच्या माध्यमातून थोडेफार आर्थिक उत्पन्न मिळते ते देखील वेळेवर जाहिरातीची रक्कम मिळाली तर पत्रकारांनी विविध क्षेत्रांत कामं करणाऱ्यां व्यक्तींच्या कौतुकाच्या बातम्या लावल्या तर सर्वांना आवडतात मात्र समाजात, राजकारणात, प्रशासनात किंवा कुठे काही चुकीचे घडल्यास त्या बाबत जर का पत्रकाराने खरं ,सत्य लिखाणाची बातमी छापली तर त्या व्यक्तींना तो पत्रकार वाईट दिसतो. पत्रकारिता करतांना पत्रकारांनी आपली प्रतिमा आणि कर्तव्य जोपासले पाहिजे.पत्रकारितेचे युग बदलत असले तरी आजही प्रिंट मिडियांच्या बातम्या खऱ्या मानल्या जातात कारण प्रचंड प्रमाणात वाढत जाणाऱ्या सोशल मीडिया बाबत साशंकता निर्माण झाली आहे. सोशल मीडियामुळे पत्रकारांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. पत्रकारिता जरुर करावी मात्र त्यातून आपली उपजीविका चालते का याचाही विचार झाला पाहिजे. लिखाण करतांना जो कोणी चुकत असेल, तर मग ती व्यक्ती कोणीही कितीही मोठी असो त्या विरोधात न घाबरता पत्रकाराने लिहिलेच पाहिजे मग त्या ठिकाणी आमदार म्हणून मी जरी असलो तरी माझ्या विरोधातही लिहिले पाहिजे. परंतु बातमीत सत्यता असावी. असे स्पष्ट आणि रोखठोक मत आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मांडले.
मधुर खान्देश वृत्तपत्राच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्हाईस ऑफ मीडिया पाचोरा संघटनेचे सल्लागार तथा आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार विनायक दिवटे, मिलिंद सोनवणे,तालुकाध्यक्ष नंदकुमार शेलकर, शहराध्यक्ष प्रविण बोरसे, कार्याध्यक्ष राहुल महाजन पदाधिकारी निखिल मोर, दिलीप परदेशी, प्रशांत येवले, जावेद शेख, नरसिंग भुरे, बाबुलाल पटेल, राजेंद्र खैरनार आदी पत्रकार बांधवानी आ.किशोर आप्पा यांचा पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन सत्कार केला. या प्रसंगी विविध प्रिंट आणि सोशल मीडियाचे संपादक, प्रकरण सह पत्रकार अनिल आबा येवले, प्रवीण ब्राह्मणे, सुनील पाटील ,नगराज पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, दिलीप पाटील, बंडू सोनार यांचे सह स्विय सहाय्यक राजेश पाटील, दत्ता बोरसे पाटील, किशोर डोंगरे, प्रविण पाटील, कुंदन बेलदार यांचे सह शहरातील विविध क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्येष्ठ पत्रकार तथा एंकर आयाज भाई (जळगाव) यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button