आचार विचार व प्रामाणिकपणा हाच ब्राह्मण समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन – गिरीश कुलकर्णी
Ethics and honesty are the only way to look at Brahmin society - Girish Kulkarni
पाचोऱ्यात भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा
आबा सूर्यवंशी ✍️
(महाराष्ट्र प्रतिनिधी) जळगांव – ब्राह्मणाकडे शुद्ध आचरण, उच्च विचार, प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची क्षमता असली पाहिजे. आचार विचार व प्रामाणिकपणा ह्याच दृष्टीने इतर समाज ब्राह्मण समाजाकडे पहात आला असून तो टिकवून ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त पाचोरा येथे आयोजित ‘ब्राह्मण समाज संघटन’ या विषयावर बोलताना आशा फाउंडेशन जळगावचे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय ब्राह्मण समाज पाचोरा तर्फे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. येथील नगर परिषदेच्या व्यापारीभवनात जन्मोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत समाज बांधवानी काळ्या फीत लावून कार्यक्रम स्थळापर्यंत मूक रॅली काढली. भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, शांतीपाठ म्हणून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व समाजातील दिवंगत बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या बौद्धिक वर्गात समाज संघटन कसे असावे, समाज बांधवांचे आचरण कसे असावे, संघटना मजबूत करण्यासाठी काय करावे या विषयी गिरीश कुलकर्णी यांनी वेगवेगळे दाखले देत ब्राह्मण समाजाने आदर्शवत असलेच पाहिजे असे प्रतिपादन केले.यावेळी अ. भा. ब्राह्मण समाजाचे पाचोरा शाखेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, तालुकाध्यक्ष गजानन जोशी, सागर तांबोळी, सुनील गौड, महावीर गौड, अरुण गौड,शामकांत सराफ, आदित्य बिल्दिकर, गणेश पांडे, प्रभुलाल शर्मा, ॲड .सचिन देशपांडे,दिनेश पाटील, संदीप शहापुरकर, ॲड .प्रशांत कुलकर्णी, नीतीन देशपांडे, रामभाऊ शर्मा, अरुण ओझा,भरत तिवारी,सचिन देशपांडे यांचेसह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. किशोर पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार महावीर गौड यांनी मानले.अ. भा. ब्राह्मण समाज महिला मंडळानेही कार्यक्रमात सहभाग घेतला.