सामंजस्याने कामे केल्यास विकास होतो ! खा.स्मिताताई वाघ

खासदारांनी केंद्रातून रोजगार देणारे प्रकल्प द्यावे. आ.किशोर आप्पा पाटील

पाचोरा येथे उद्यान लोकार्पण कार्यक्रमात मागणी!

आबा सूर्यवंशी
(महाराष्ट्र प्रतिनिधी)-

पाचोरा शहराच्या स्मशानभूमी शेजारील नगर परिषदेच्या ओपनस्पेस जागेत केंद्र सरकारच्या २०२२- २३ केंद्र सरकारच्या भांडवल गुंतवणूक विशेष सहाय्य निधीतून सुमारे १ कोटी खर्चाचे भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यानाचे लोकार्पण दि. ४ मे रोजी खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते तर कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडले. या वेळी प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी प्रास्ताविकात नगर परिषदेच्या वतीने शहरात आ. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नियोजित विकास कामांची माहिती दिली.

खा.स्मिताताई वाघ
खासदार आणि आमदार आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, सामंजस्याने कामे केली तर विकास होत असतो.पाचोरा मतदार संघात किशोर आप्पा पाटील यांच्या सारखे विकासपुरुष मिळाल्याने या मतदार संघात अभुतपूर्व भुतो न भविष्यती विकासाची कामे होत आहेत. केंद्रीय स्तरावर जनतेची जी काही कामे असतील त्यांनी मला हक्काने सांगावी ती कामे मार्गी लावेल अशी ग्वाही दिली. शहरात होणारी विकासकामे आपली समजून जनतेने त्याचे रक्षण आणि संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.

आ.किशोर आप्पा पाटील
शहरातील हा भाग मागील दहा वर्षांपासून विकासापासून दुर्लक्षित आणि अतिक्रमित होता. मात्र आता या भागात नागरिकांना रस्ते, वीज , नागरी मूलभूत सुविधा मिळत असल्याने आता परिस्थिती बदलली आहे.या परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण कडे दुर्लक्ष केले पाहिजे.नव्याने बांधलेले उद्यान लहान मुलांचेच नव्हे तर नाना – नानी जेष्ठ नागरिकांसाठी असून सर्वांनी उद्यान आणि परिसर आपला समजून स्वच्छ ,सुंदर आणि he उद्यान बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. खासदार स्मिताताई वाघ यांनी मतदार संघातील नगरदेवळा येथे लवकरच सुरू होणाऱ्या एमआयडीसी जवळ रेल्वेव्यागन निर्मितीचे , आग्रिकलचर संबंधित मकास्टार्च सारखे प्रकल्प दिल्यास हजारो बेरोजगारांना रोजगार मिळतील असे साकडे घातले. पाचोरा शहरात आज पर्यंत अडीचशे ते तीनशे ओपन स्पेस सुशोभिकरण करण्यात आली असून नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. या परिसराच्या विकासाकडे मी अधिक लक्ष देणार आहे. सद्या राज्य सरकार आर्थिक अडचणीत असल्याने दोन वर्ष जनतेने सहकार्य करण्याचे आणि उद्यानाच्या रक्षण करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी नगररचना विभागाचे सहा. संचालक राजेश पाटील,सचिन पाटील, मुख्याधिकारी मंगेश देवरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उप नगराध्यक्ष, शरद पाटे, बंडू चौधरी, उप जिल्हाप्रमुख किशोर बारवकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार , कांतिलाल जैन,रमेश वाणी, सुनील पाटील,नंदू सोमवंशी, एमएसपी बिल्डकॉनचे उद्योजक मनोज शांताराम पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील, करनिरीक्षक श्री. मराठे, सहा.रचनाकार प्रियंका पाडवी ,धीरज नेटके,माजी नगरसेवक अयुब बागवान, रहीम बागवान, गंगाराम पाटील, शाकीर बागवान डॉ.आलम देशमुख, काँग्रेस जिल्हा सचिव इरफान मण्यार,आतीक सर, सैय्यद गफार, सुपर वायझर जितेश पाटील, तोशीब शेख आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले.तसेच कार्यक्रमात मक्तेदार मनोज शांताराम पाटील आणि उद्यानाची सुरेख पेंटिंग काम करणारे कलाकार आबा सूर्यवंशी यांचे विशेष सत्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button