संकटं शिकवतात जीवनाचं खरं तत्त्वज्ञान श्री रसराज प्रभूजी आबा सूर्यवंशी

Tribulations teach the true philosophy of life! Shri Rasaraj Prabhuji Aba Suryavanshi

(महाराष्ट्र प्रतिनिधी)
जळगांव/ पाचोरा – श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिर पाचोरा यांच्या वतीने भगवद्गीता साप्ताहिक सत्संगाचे भव्य आयोजन रविवार, दि. ४ मे रविवार रोजी करण्यात आले.
या सत्संगामध्ये इस्कॉन दिल्ली येथील प्रसिद्ध प्रवचनकार एच.जी. रसराज प्रभू यांचे स्फूर्तिदायक प्रवचन झाले. त्यांचा संदेश भक्तिमार्ग आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचे जीवनाशी असलेले अविस्मरणीय संबंध सांगणारा होता. रसराज प्रभू म्हणाले, जीवनातील प्रत्येक व्यक्तीला दुःख, संकोच आणि संकटं येतात, पण प्रत्येक संकटामध्ये एक शिकवण आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की ‘जीवितातली प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे, आणि जेव्हा तुम्ही या सत्याला समजून स्वीकारता, तेव्हा तुम्ही आतून शांती अनुभवू लागतात.शरीराच्या कक्षेतील जीवनातील प्रत्येक टप्प्याचा उद्देश हेच आहे की, तुम्ही तुमच्या आत्म्याला ओळखा आणि भक्तीमार्गावर दृढ राहा. असे प्रवचनात उपदेश केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button