बँकांच्या मनमानी बाबत जनतेच्या तक्रारी येता कामा नये* आ. किशोर पाटील,पत्रकारांनी बँक व्यवस्थापकांना धरले धारेवर !,बँक व्यवस्थापकांची बोलती बंद !
Public complaints should not be received regarding the arbitrariness of banks, A. Kishor Patil, Journalists held bank managers at bay!, Bank managers' talk is stopped!
पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)
शहरातील राष्ट्रीयकृत बँकाचे एटीएम गेल्या काही दिवसांपासून या- ना – त्या कारणांनी बंद अवस्थेत आहेत. यामुळे सर्व सामान्य जनते सह ऐन खरिपाचा हंगामात शेतकऱ्यांना शेती आणी अन्य कामांसाठी रोकड स्वरूपात पैश्यांची गरज , तसेच विविध अनुदानाच्या रकमा त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या असताना केवळ एटीएम बंद ठेवण्यात येत असल्याने आर्थिक अडचणीचा प्रश्न उपस्थित झाला होता. शेतकरी, आणि जनतेने जागरूक पत्रकारांकडे बँकांच्या मनमानी कामकाजांच्या बाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. पत्रकारांनी हा विषय गांभीर्याने घेत राष्ट्रीयकृत बँका, आणि अन्य संस्थांनी सुरू केलेल्या एटीएम बंद बाबत आवाज उठवीत दि.२९ गुरुवार रोजी आमदार किशोर पाटील यांचे प्रतिनिधी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील आणि प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना लेखी निवेदन दिले होते. निवेदनात काही मुजोर झालेल्या बँक व्यवस्थापक, कर्मचारी यांच्या कडून विविध बँकांमध्ये सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, अपंग वृद्ध यांना मिळणारी वागणूक, बँक ग्राहकांसाठी बँकेत, बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक सोई, सुविधा पार्किंग.तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची ग्राहकांसोबत बोलण्याची, वागण्याची आणि विविध प्रकारच्या तक्रारी बाबत निवेदन देऊन आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातल्या सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली होती.
आमदारांकडून निवेदनाची दाखल ; आणि तातडीची बैठक
जागरूक आणि जनतेच्या समस्या बाबत दिलेल्या निवेदनाची आ.किशोर आप्पा पाटील यांनी दखल घेत प्रांताधिकारी यांना सर्व बँकांचे मॅनेजरांची बैठक घेण्याचे आदेश दिल्या वरून दि.३० शुक्रवार रोजी प्रांताधिकारी दालनात आ.किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेत तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील,शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सुनिल पाटील आणि भीमसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण ब्राह्मणे आणि निवेदन देणारे पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांनी बँक अधिकाऱ्यांना धरले धारेवर
शहरातील राष्ट्रीयकृत बँकांचे बाबत निवेदनात नमूद केल्या तक्रारी , मागण्या बाबत आमदारांनी विविध बँकांचे अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच शेतकरी खातेदार, जेष्ठ नागरिकांच्या सोयी सुविधा बाबत, बेरोजगारांना मुद्रा लोन मधील , शेतकऱ्यांना विविध योजनेतून किती लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले या बाबत माहिती घेतली तसेच अनेक वर्षांपासून महाराष्ट्र , सेंट्रल आणि अन्य काही बँका कोणत्याही सुविधा नसलेल्या इमारतीत बँका का चालवित आहे, स्वतःच्या जागा का घेत नाही, आणि जनतेच्या बँक अधिकाऱ्यांच्या कामकाजा बाबत जेष्ठ नागरिक व्ही.टी.जोशी, पत्रकार सी एन चौधरी, संदीप महाजन, लक्ष्मण सूर्यवंशी, राहुल महाजन, निखिल मोर, यांनी बातमीच्या चर्चेत भाग घेऊन बँक अधिकारी ग्राहकांना काय सुविधा देतात, पात्र लाभार्थी गरजूंना किती आर्थिक लाभ दिले, शेतकरी, जनतेच्या विविध समस्या साठी काय करतात अशा अनेक तक्रारी बाबत विचारणा करून त्यांना धारेवर धरले.
आमदारांकडून सक्त निर्देश
शहरातील राष्ट्रीयकृत सह बँकांचे. अधिकाऱ्यांनी शेतकरी, जेष्ठ नागरिक, अपंग वृद्ध , विद्यार्थी आणि सर्व प्रकारच्या बँक ग्राहकांना आवश्यक सुविधा दिल्या पाहिजे, या पुढे कोणत्याही तक्रारी येता कामा नये, आवश्यक आणि विविध योजनांचे लाभार्थ्यांना राज्य, केंद्र सरकारने घोषित केलेल्या योजनातून आर्थिक लाभाचे प्रकरणे मंजूर करावे.काही ठराविक ग्राहकांचे कडे करू नये. बँक अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांनी बँकेत येणाऱ्या लोकांशी मर्यादित वागावे आणि ज्या बँक सुविधा नसलेल्या इमारतीत सुरू त्यांनी स्वतंत्र सोईस्कर जागा घेऊन बँका स्थलांतरित कराव्या त्या साठी आवश्यक ती मदत मी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यास तयार असल्याची ग्वाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बैठकीच्या समारोपात दिली.