शेतकरी कर्जमाफी तसेच शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन शेतकरी संघटना ने दिले
Farmers' organization submitted a statement for farm loan waiver and various demands of farmers and disabled people
कराड : विद्या मोरे माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दि 8 जून पासून सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सहावा दिवस असून देखील राज्य सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे, सरकार ने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा प्रहार संघटनेसोबत शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने कराड च्या तहसीलदार सौ कल्पना ढवळे भंडारी यांच्या मार्फत देण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घराळ (बापू ), विवेक कुराडे पाटील, युवराज कुराडे पाटील, विनोद पाटील, महेश पाटील, सौ विद्या मोरे, अर्चना जाधव, राम कुराडे, संजय कुराडे, नजीर पटेल, हुसेन पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते