शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी’, विविध संघटने कडून देण्यात आले निवेदन

Farmers should get loan waiver, statement given by various organizations

कराड : विद्या मोरे

शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर शेतकऱ्याचे संघटना असे मिळून सरकारने तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे निवेदन कराड तहसीलदार कार्यालय मध्ये नायब तहसीलदार श्रीयुत राठोड यांना देण्यात आले, यावेळी शेकाप जिल्हाध्यक्ष भाई समीर देसाई यांनी 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत जर ‘कर्जमाफी मिळाली नाही, तर आम्ही ‘तीव्र आंदोलन करू’ यास सरकार जबाबदार राहील , तसेच गेल्या दहा वर्षात औद्योगिक क्षेत्र चालवणाऱ्या अदानी’, अंबानी सारख्या व इतर मंडळींचे16 कोटी लाख रुपये केंद्र सरकारने माफ केले आहेत, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर सरकार उपकार करत नाही , महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार या शब्दावरच निवडून आलेले आहे,असे प्रतिपादन शेखर जिल्हाध्यक्ष अडवोकेट भाई समीर देसाई यांनी केले, यावेळी शेकाप जिल्हाध्यक्ष अडवोकेट भाई समीर देसाई ,बळीराजा शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील, रासप चे महेश जिरंगे, संदीप धुमाळ,शेकापचे भाई , जाधव ,दिनकर, गुरव ,आनंदराव थोरात, अनिल जगताप व इतर सर्व पक्षांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button