कराडला महाराष्ट्रातील पहिले मॉक पार्लमेंट संपन्न आणीबाणी लादल्याचा देशासाठी काळा दिवस –आमदार चित्राताई वाघ
Karad, Maharashtra's first mock parliament, imposes emergency, a black day for the country -- MLA Chitratai Wagh
कराड : विद्या मोरे
संविधानाची मोडतोड करण्याचे काम पन्नास वर्षापूर्वी काँग्रेसने केले. लोकशाहीचा गळा घोटण्याचे इंदिरा गांधी यांनी केलं. त्यांनी देशात आणीबाणी लादली होती. तो देशासाठी काळा दिवस होता, असे प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील पहिले मॉक पार्लमेंट कराड येथे संपन्न झालं. त्यावेळी आमदार वाघ बोलत होत्या. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले पार्लमेंटच्या संयोजिका वर्षा भोसले, उत्तराताई भोसले यांच्यासह भाजपच्या राज्यातील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
आमदार वाघ म्हणाल्या, 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी जाहीर केली. सरकारच्या विरोधात जे बोलेल त्यांना तुरुंगात टाकले जात होते. जनतेच्या अधिकारांवर गदा आणली गेली होती. अनेकांना तुरुंगात टाकले गेले. देशातील जनतेवर अन्याय केला गेला. भारताच्या स्वातंत्र्याच्या 28 वर्षा नंतर भारताच्या जनतेला वेठीस धरलं गेलं.तो दिवस काळा दिवस म्हणून भाजप साजरा करत आहे. संविधानाची मोडतोड कशाप्रकारे काँग्रेसने केली हे आजच्या युवकांना माहीत झाले पाहिजे. यामुळे मॉक पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन भारताची निर्मिती करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रातलं पहिलं मॉक पार्लमेंट ते आयोजित करण्यात आलं. केंद्रामध्ये आपली संसद कसं काम करतं हे तरुण पिढी मधल्या लोकांना दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातून यशस्वी रित्या कराडमध्ये झालं. हे पार्लमेंट घेत असताना 1975 साली जी आणीबाणी देशामध्ये लागू झाली होती आणि तो भारताच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आपण आजपर्यंत त्याची आठवण करतो. अशा आणीबाणी मध्ये काय परिस्थिती उद्भवली? आणि त्या परिस्थितीचा उल्लेख घेऊन या पार्लमेंट मध्ये सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष यांच्या मधल्या विविध संभाषणाच्या विषयीची चर्चा ही या पार्लमेंटच्या माध्यमातून घडवून आणण्याचं काम हे महिला मोर्चाच्या माध्यमातून झालेलं आहे. या अशा चर्चे मधून नवीन तरुण पिढीला पार्लमेंट कसं चालतं? संसद कसं चालतं आणि कशा पद्धतीचे विचार ठेवल्या जातात आणि त्या विचारांमधून बोध आपण काय घेतला पाहिजे याच्या विषयीचे एक व्यवस्थित चित्र तयार करण्याचं काम या झालेलं आहे. मला खात्री वाटते की यामधून तरुण पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. राजकीय कार्यकर्त्यांना देखील शिकण्यासारख्या आहेत. विशेषतः याचं लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजे थेट प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे असंख्य लोकांच्या मोबाईलवर असंख्य लोकांच्या लॅपटॉपवर थेट हे बघायला मिळणार आहे. आणि त्याच्या मधून अनेकांचा फायदा होईल, अशी माझी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.