विरोधक महाराष्ट्राचे वातावरण खराब करीत आहे. आ.किशोर आप्पा पाटील

उद्धव - राज ठाकरे मतलबी राजकारणासाठी एकत्र.?,पाचोरा निर्धार मेळाव्यात विरोधकांवर टीका

पाचोरा प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)- आगामी नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि अन्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शनात दि. २८ जून शनिवार रोजी प्रसाद हॉल येथे सकाळी १० वाजता शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारवकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, युवानेते सुमित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, माजी नगरसेवक महेश सोमवंशी, दत्ता जडे, अयुब बागवान,श्री.तडवी , युवासेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख सुनिल पाटील, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील,भीमशक्ती शिवशक्ती जिल्हा प्रमुख प्रवीण ब्राह्मणे,संचालक प्रकाश तांबे, युसूफ पटेल, शाळीग्राम मालकर, तालुका प्रमुख विनोद तावडे, शहर प्रमुख सुमित सावंत, डॉ. आलम देशमुख, डॉ. भरत पाटील, राजेंद्र पाटील, संजय एरंडे, एकलव्य संघटनेचे धर्मा भील,नरेंद्र पाटील,भरत खंडेलवाल, संदीप राजे, भोला पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी स्मिता बारवकर, जया पवार, ललिता पाटील, मंदाकिनी पारोचे, सुषमा पाटील, संगीता साळुंखे, आदींसह शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनाचे प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व पदाधिकारी, शेतकी संघ संचालक, माजी नगरसेवक, ग्राम पंचायतीचे सरपंच , सदस्य,वि.का सोसायटीचे चेअरमन, व्हाँ चेअरमन , संचालक, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख, बुथप्रमुख, शिवदुत व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदारांच्या विकासाची माहिती घरोघर पोहोचवा*

सदर मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील मनोगतात म्हणाले की, पुढील सर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या असून आमदार जे काही आदेश देतील ते प्रमाण मानून सर्वांनी काम करावे, आमदारांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघर पोहोचवावी. पक्षात प्रवेश झाला पण, पक्षकार्य करावे लागेल, वरिष्ठ पातळीवर युती झाली किंवा नाही झाली तरी स्वबळावर आणि धनुष्यबाण चिन्हावरच निवडुका लढवून मतदार संघात आमदारांच्या भगवा फडकविण्यासाठी जोमाने काम करा.

*कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी दहा पट घाम गळणार !
निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करतांना किशोर आप्पा पाटील यांनी जाहीर केले की, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाचोरा व भडगाव तालुक्यातून अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठ्या संख्येत प्रवेश होत आहे. आमच्या शिवसेनेकडे गर्दी होत असल्याचे विरोधक म्हणतात ती सांभाळण्याची हिंमत असावी लागते. आमच्या पक्षात जे कोणी प्रवेश घेत आहे त्यांचा मान राखला जाईल ,अनादर होणार नाही. आगामी काळातील कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी मी , युवानेता सुमित पाटील आणि मुलगी डॉ.प्रियंका तन मन आणि धनाने अहोरात्र काम करून दहापट घाम गळणार असल्याची ग्वाही दिली.

विरोधक महाराष्ट्राचे वातावरण खराब करत आहे.

विरोधकांना टोला लावताना म्हणाले की ज्यांना जनतेने पन्नास हजार मते दिली ते काही विरोधक नॉट रिचेबल झाले असून काही पुण्याला आणि नाशिकला शिफ्ट झाल्याच्या चर्चा आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ८० पैकी ६० आमदार निवडून आले, तर ठाकरेंचे १२० पैकी फक्त २० आमदार जनतेने निवडून दिले.

उद्धव – राज ठाकरे मतलबी राजकारणासाठी एकत्र

उद्धव आणि राज ठाकरे हे मुंबई महापालिकेच्या मतलबी राजकारणासाठी एकत्र येत असून मराठी, हिंदी भाषेच्या मुद्द्यावर मराठी माणसांची दिशाभूल करीत आहे. यांचे राजकीय अस्तित्व संपले आहे. होय आम्ही मराठी आहोत ,आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे. हिंदी भाषा राष्ट्रभाषा असल्याने भावीपिढी साठी तेव्हढीच महत्वाची असल्याने विरोध नसावा . विरोधक महाराष्ट्रात वातावरण खराब करीत असल्याचा सडेतोड शब्दात समाचार घेतला.

मतदारांचे मरे पर्यंत उपकार विसरणार नाही

या मतदार संघात तिसऱ्यांदा कोणीच आमदार झाला नाही, पण मतदारांनी मला तिसऱ्यांदा आमदार करून ईतिहास घडविला असून मी मतदाराचे उपकार मरे पर्यंत विसरणार नाही. पक्ष प्रमुख , उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनहिताचे, महिला भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. आज आम्ही महायुतीच्या सत्तेत लाडक्या बहिणींमुळेच असून महायुतीच्या सत्तेत लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. विरोधक नेरेटिव्ह पसरविण्याचे काम करीत आहे. आमच्या पक्षात कोणतीही फूट किंवा गैरसमज नाही. वरिष्ठ स्तरावर युती बाबत जो काही निर्णय होईल त्या नुसार वाटचाल राहील.जो पक्षकार्य करेल त्यांची कामे पाहूनच उमेदवारी दिल्या जातील, भेदभाव होणार नाही . पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आगामी काळातील निवडणुका जिंकण्यासाठी काम केल्यास विरोधकांच्या एकही जागा निवडून येणार नाही.कार्यकर्त्यांनी विजयाच्या आणि मताधिक्याचे भरवश्यावर आणि बे सावध राहू नये असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button