बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
कराड : विद्या मोरे
परतुर जिल्हा जालना चे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हाध्यक्ष ॲड भाई समीर देसाई यांनी जाहीर निषेध केला आहे. तुम्हा सर्व शेतकऱ्यांचे तसेच तुमच्या बायकांची मुलींचे चे कपडे तसेच इतर खर्च आम्ही दीड हजार रुपये देऊन करतो”. तुम्हा सर्व शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे आम्ही देतो, असे अत्यंत निंदनीय वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी केले. त्या वक्तव्याचा जाहीर निषेध शेतकरी कामगार पक्षाच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अडवोकेट भाई समीर देसाई म्हणाले, “या सरकारला सत्तेची धुंदी चढली आहे “त्यामुळे सरकारमधील बरीच मंडळी रोज नव नवीन वादग्रस्त विधाने शेतकऱ्यांच्या विरोधात करत आहेत. या सरकार मधील मंडळींचा असा गैरसमज आहे की 2014 नंतर या सरकारने पैसे दिल्यावरच शेतकरी पेरणी करायला लागला आहे. शेतकरी हा बियाणे, औषधे घेताना तसेच इतर सर्व वस्तू घेताना जीएसटी रुपी टॅक्स भरत असतो. या सरकारने असा शेतकऱ्यांबद्दल अपप्रचार चालू केला आहे की, शेतकरी हा ‘टॅक्स भरत नाही’ बाकीचे सर्व लोक टॅक्स भरतात, तो नेहमी कर्जमाफी मागतो. असा लोकांचा गैरसमज करून दिल्यामुळे लोकही शेतकऱ्यांकडे तुच्छ नजरेने पाहतात . शेतकऱ्याला त्याच्या मालाचा हमीभाव द्या . शेतकऱ्याला हमीभाव दिला तर त्याला कुणाच्याही समोर हात पसरावे लागणार नाहीत. 2014 साली, सोयाबीनला सहा हजार रुपये दर होता,आज 2025 रोजी व्यापाऱ्याकडे सोयाबीन विकले तर चार हजार रुपये मिळतात, ही तफावत इतर लोकांच्या बाबतीत दिसत नाही,हे फक्त शेतकऱ्याचे मालाबद्दलच घडत. कधीतरी भाजीपाल्याला भाव मिळाला, तर ‘महागाई वाढली’ असे हे लोक सतत ओरडत असतात. पण ऊस, सोयाबीन,कापूस तसेच इतर भाजीपाला याला गेली दहा वर्षे झाले रास्त भाव मिळत नाही, याचे सरकारला किंवा कोणाला सोयर सुतक पडलेले नाही. सत्तेने आंधळे झालेले असे लोणीकरांसारखे आमदार सतत काही ना काहीतरी विक्षिप्त असे बोलत असतात,याचा जाहीर निषेध एडवोकेट भाई समीर देसाई यांनी केला. या बैठकीला भाई एम आर जाधव, भाई दिनकर गुरव, अनिल जगताप, गणेश जगताप, भाई पोपटराव जगताप ॲड सयाजीराव कवळे, ॲड पंडितराव गायकवाड तसेच इतर पदाधिकारी हे उपस्थित होते.