शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचे दुःख साहित्यातून लिहीले पाहिजे:डॉ. सदाशिव सूर्यवंशी.
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे १६ व १७ जाने. दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १६ जाने. रोजी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. दिनेश भदाणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक व कनिष्ठ महाविद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा.सुभाष तोतला होते. या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री दिनेश भदाणे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी कठीण मेहनत आणि चिकाटी व सातत्य याच्या जोरावरच यश प्राप्त होत असते आणि तसे प्रयत्न विद्यार्थ्यांनी नेहमीच केले पाहिजे. याबरोबरच या कार्यक्रमात संस्थेचे संचालक दुष्यंतभाई रावल यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा.सुभाष तोतला म्हणाले की, महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटनी देण्याचे काम करते यासाठी विविध सोयी सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात त्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे व्ही.पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.स्वप्निल भोसले तर आभार डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्याच्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये गीत गायन,वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, समूहगीत, डिश डेकोरेशन, रांगोळी स्पर्धा, नाट्य स्पर्धा, विडंबन नाट्य, मिमिक्री, फॅन्सी ड्रेस, अशा विविध स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*दि. १७ जानेवारी रोजी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा विभाग पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम* या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे येथील सुप्रसिद्ध वक्ते आणि शिवव्याख्याते, गझलकार डॉ.सदाशिव सूर्यवंशी होते. यावेळी डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघावी व ती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे मेहनत घ्यावी तसेच वेगवेगळ्या कविता व गझल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साहित्य लिखाणाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कवितांमधून आपल्या बापाचे दुःख मांडले पाहिजे साहित्यीकाने साहित्यातून समाजाची सत्यता मांडावी त्याने खुद्दार व्हावे पण गद्दार होऊ नये विद्यार्थ्यांनी प्रगती करताना आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला विसरू नये असे मत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात पाचोरा पोलीस विभागाचे विभागीय अधिकारी धनंजय येरुळे साहेब यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायबर सिक्युरिटी आणि गुन्हेगारी संदर्भात मार्गदर्शन केले याबरोबरच या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमची संस्था आणि महाविद्यालय विविध प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते विद्यार्थ्यांना जितक्या चांगल्या सुविधा देता येईल तितक्या देण्याचा प्रयत्न संस्था आणि महाविद्यालयाचा असतो या महाविद्यालयातून अनेक अधिकारी शिक्षक, प्राध्यापक,डॉक्टर,इंजिनिर, प्रशासकीय सेवेतील अधिकारी झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे या पुढेही विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठावी या साठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.किरण पाटील, डॉ. श्याम साळुंखे यांच्या क. ब चौ. उ.म विद्यापीठ जळगाव अंतर्गत F.Y.BCom या वर्गाच्या अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापकांपैकी विविध स्तरावर तज्ञ म्हणून निवड झालेले प्रा.डॉ.जे पी बडगुजर, डॉ शरद पाटील, Ph.D पदवी प्राप्त डॉ.डी. एस. पाटील, डॉ.वाय बी पुरी, डॉ. सरोज अग्रवाल व क.ब.चौ.उ.म विद्यापीठ जळगाव इतिहास विषयात Ph.D मार्गदर्शक मानून मान्यता मिळालेले शिवव्याख्याते डॉ. माणिक पाटील यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार , संस्थेचे व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी, जेष्ठ संचालक प्रा.सुभाष तोतला, अण्णासाहेब दगाजी वाघ, प्रकाश एकनाथ पाटील, योगेश माधराव पाटील, के. के. पाटील, उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले,उपप्राचार्य डॉ. जे. व्ही.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जी. बी. पाटील, पर्यवेक्षक प्रा.एस. एस . पाटील,डॉ. एस .बी. तडवी, डॉ.अतुल सूर्यवंशी आदीं उपस्थित होते.कार्यक्रमात वार्षिक संस्कृती कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थी व क्रीडा विभागातील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देऊन सन्मानित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी केले,पारितोषिक यादी वाचन डॉ.माणिक पाटील प्रा. स्वप्नील भोसले केले तर सूत्रसंचालन डॉ. सुनिता गुंजाळ व प्रा.वैशाली बोरकर यांनी तर आभार डॉ. एस. बी. तडवी यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पत्रकार लक्ष्मण आबा सूर्यवंशी ,सी एन.चौधरी सर ,आबा येवले, राजेंद्र खैरनार उपस्थित होते.