नव्या पिढीला पंख द्या! बुरसटलेले विचार देवू नका !! ….अरुणभाई गुजराथी
Give wings to the new generation! Don't give stale thoughts!! ....Arunbhai Gujarathi
पाचोरा येथे व्हा .चेअरमन व्हि.टी.जोशी यांचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न!
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा सह अनेक क्षेत्रात योगदान आणि मार्गदर्शक पाचोरा तालुका सह शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन नानासाहेब व्हि. टी. जोशी यांच्या पंच्याहत्तरी निमित्त संस्थेने “ज्ञानामृत” सोहळा राज्य विधीमंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेत तर जळगांव क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू प्रा. डॉ.विजय माहेश्वरी, नासिक पदवीधर मतदार संघाचे आ. सत्यजित तांबे, कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, संस्थेचे अध्यक्ष माजी आ. दिलीप वाघ, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख , संचालक डॉ.जयवंत पाटील, खलील देशमुख, दुष्यंत रावळ ,सतीश चौधरी, नानासाहेब देशमुख ,सिनेट सदस्य अमोल पाटील, माजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील प्राचार्य डॉ .शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य जे.व्ही.पाटील. आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे दिवंगत शिल्पकार यांचे प्रतिमापूजन, काश्मीर पहेलगाम येथे अतिरेक्यांच्या गोळीबारात ठार झालेले भारतीय नागरिकांना श्रद्धांजली आणि स्वागत गीताने करण्यात आली.
व्हि.टी.नानांचा गौरवग्रंथ भावी पिढीसाठी प्रेरणादायी…. – दिलीप वाघ
अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष दिलीप वाघ यांनी प्रासविकात म्हणाले की, सत्कारार्थी व्ही. टी. नाना जोशी यांचा अमृत महोत्सव हा संस्थेचा कौटुंबिक सोहळा आहे. त्यांच्या गौरव ग्रंथाला सुवर्ण स्पर्श आहे. त्यांनी जीवनात अनेक माणसं जोडली त्यांचा गौरव ग्रंथ भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.या संस्थेच्या उभारणी साठी दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून संस्थेने उतुंग यशाची भरारी घेतली. त्यांचे आदर्श कार्य नजरे समोर ठेवून व्हि .टी. नाना संस्थेला मार्गदर्शन करून अडीअडचणी सोडवितात.
आ.सत्यजित तांबे…..
व्ही.टी. नाना जोशी यांची शैक्षणिक गुणवत्ता व बौद्धिक क्षमता अफाट असून सर्वच क्षेत्रातील अनुभव पाहता समाजाला त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची गरज आहे.
कुलगुरू श्री. महेश्वरी…. एकाच संस्थेत प्रदीर्घ काळ कार्य करतांना एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असावी लागते ते सर्व गुण व्ही.टी. नानात आहे. शिक्षण महत्वाचे साधन असून शिक्षणात सामाजिक विषमता दुर करण्याची शक्ती आहे . विद्यापीठाच्या सभागृहात त्यांच्या सूचना गांभीर्याने घेतल्या जातात.
सत्कारार्थी श्री.जोशी …. मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की पन्नास वर्षांपासून मी शिक्षण, रोटरी ,ग्राहक सेवा संघ , बँकिंग, विविध क्षेत्रात कामं करतांना मला अनेक अनुभव आले.माझे वडील देखील संस्थेचे सदस्य होते.मी पण या संस्थेचा विद्यार्थी आणि कर्मचारी होतो. संस्थेत लिपीक पदा पासून अनेक पदांवर काम करतांना मी माझे वडिलांच्या विचारांचा वारसा आणि शिकवणीतून काम करीत आहे. आजच्या विद्यार्थी पिढीला काय अपेक्षित आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावे, सोई सुविधा दिल्या पाहिजे तरच भविष्यात शैक्षणिक संस्था चालविता येतील अशी खंत व्यक्त केली, शिक्षण क्षेत्रात कार्य करतांना राजकीय जोडे बाहेर काढून ठेवावे असे ही आवाहन केले.
माजी सभापती अरुणभाई गुजराथी…..
राज्यविधी मंडळाचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की, जे दुसऱ्यांना अमृत देतात त्या व्हि.टी जोशी नानांचा अमृत महोत्सव म्हणजे गुणवान व्यक्तीचा सन्मान आहे. आपण कोणाचा सन्मान करतो त्या वरून संस्कार लक्षात येतात. शिक्षणावर बोलले की, संस्कार, संस्कृती आणि शिक्षणाचे जवळचे नाते आहे. नव्या पिढीला शैक्षणिक भरारीचे पंख द्या! बुरसटलेले विचार देवू नका !! शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्या सोबत दायित्व असावे. मानवता निर्माण करण्यासाठी वात्सल्य, करुणा जोपासून पुढे जावे.ज्याला अहंकार नाही तेच जीवनाचा अलंकार आहे. गुणांचा जेव्हा सत्कार होतो तेव्हाच प्रेरणा मिळते असे मोलाचे विचार प्रगट केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष शांताराम सोनजी पाटील, पाचोरा पीपल्स बँक चेअरमन अतुल संघवी, पूनम मोर, जीवन जैन, संचालक दगाजी वाघ, भागचंद राका , अर्जुन पंजाबी, संजय कुमावत, जगदीश सोनार, प्रा.भागवत महालपुरे, योगेश पाटील, प्रकाश पाटील, महाविद्यालय प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक ,प्राध्यापिका, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी शहरातील नामांकित व्यक्ती, व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सी. एन. चौधरी. महेश कोंडीन्य तर आभार उप प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी लिपीक ऋषिकेश ठाकूर, नितीन पाटील, विजय सोनजे. प्रा.गिरीश पाटील, प्रा.सचिन भोसले, महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.