पाचोरा पोलिस निरीक्षकांची बदली करा !हरीभाऊ पाटील

अन्यथा आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन चा इशारा ?

( आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) –

पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक पवार हे रुजू झाल्यापासून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहर व तालुक्यात सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय बोकाळले असल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली असून सर्व सामन्यांचा जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. सदर अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी तत्काळ बदली न केल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी शासकीय विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.मागील दोन वर्षांपासून पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गावागावांत कायदा सुव्यवस्था ढासळली असून अकार्यक्षम पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोराचे संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना .देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री सचिवालय मुंबई, मा. प्रधान सचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडकाफडकी बदली न झाल्यास दिनांक २७ में २०२५ मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अर्धनग्न होऊन ढोलताशांच्या गजरात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. निवेदनात नमूद आहे की ,पाचोरा शहरातील चौकाचौकात, रहदारीच्या रस्त्यावर तसेच पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावात सट्टा, पत्ता, जुगार, ऑनलाईन चक्री या अवैध धंद्यासह गावठी दारुची निर्मिती व विक्री देशी, विदेशी दारु व गांजा सारख्या मादक पदार्थांची दिवसाढवळ्या खुलेआमपणे विक्री केली जात आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार हे कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अकार्यक्षम ठरत असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून खून, अपहरण, फुसलाऊन मुली पळवून नेणे, चोऱ्या, दरोडे, सोनसाखळी व दागिने लांबवणे, दरोडे, भरचौकात हत्याराने हल्ले करून दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न, लैंगिक छळ, विनयभंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.या प्रकारांना पोलिस निरीक्षक जबाबदार असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची तडकाफडकी बदली करणे गरजेचे झाले आहे त्यांची वरिष्ठांनी तत्काळ बदली न केल्यास मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे हरी भाऊ तुकाराम पाटील यांनी प्रसार माध्यमाद्वारे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button