सरकारी शाळा टिकविण्याची गरज – पृथ्वीराज चव्हाण

सैदापूर येथील जि.प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन, रु. ५० लाख निधीची तरतूद

कराड (प्रतिनिधी) :जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील या सर्व सरकारी शाळा सद्याच्या काळात टिकविण्याची गरज आहे, आणि हि जबाबदारी शिक्षकांची आहेच पण त्याबरोबर पालकांची सुद्धा असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते सैदापूर येथे जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, प्रा. धनाजी काटकर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गट शिक्षणाधिकारी सन्मित देशमाने, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना जाधव, उद्योजक उदय थोरात, सचिन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक युवराज बागुल, काँग्रेसचे युवानेते इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, विवेक जाधव, सुनील जाधव, बाळासाहेब जाधव-माजी चेअरमन सैदापूर सोसायटी, धनाजी जाधव, तानाजी माळी, अनिल जाधव, अभिजित जाधव, दत्तात्रय जाधव आदी यावेळी उपस्थित होते. ब्युरो चीफ विद्या मोरे कराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button