घोसला – वरठाण येथे शिवजयंती निमित्ताने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ

‌आप्पा वाघ
(छ. संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी)-
घोसला दि.२१ छ.शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंती चे औचित्य साधुन मा.ना. संजय राठोड , मंत्री, मृद व जलसंधारण, मा.ना. इंद्रनिल नाईक, राज्यमंत्री, मा. गणेश पाटील ,सचिव यांनी शिवकालीन तलाव , पाझर तलाव , गावतलाव, यातुन गाळ काढण्याचा शुभारंभ दि.२० रोजी मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता मा. नितीन दुसाने, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मा. अजितकुमार परांडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मा. नरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुर्यकांत देविदास निकम यांनी एन.जी.ओ.एकात्मिक कृषी व मानव विकास संस्था प्रकल्प कार्यालय सोयगाव यांच्या व स्थानिक शेतक-यांच्या माध्यमातुन सोयगाव तालुक्यातील मौजे वरठाण व मौजे घोसला येथे गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनेतुन प्रारंभ केला.
गाळ काढण्याचा शुभारंभ वरठाण येथील जि.प. सदस्य नंदूबापू साळुंखे व‌ सरपंच .अनिल सोळुंखे, यांच्या हस्ते उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य एन जी.ओ.चे प्रमुख संगीता बिराजदार. संभाजी नागणे.
यांच्या प्रमुख उपस्थितीत , तर मौजे घोसला येथे सरपंच गणेश माळी उपसरपंच सुभाष पाटील ग्रा. पं.सदस्य ज्ञानेश्वर युवरे माजी समाधान पाटील गोलु बोरसे व प्रतिष्ठित नागरीक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मृद व जलसंधारण उपविभाग सोयगावचे वरीष्ठ सहा. उमेश निकम, क.सहा. शरद चव्हाण इ.उपस्थित होते. शुभारंभ करतांना सर्वप्रथम छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गाळ उपसल्याने गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार हि संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार असुन निघालेला गाळ शेतक-यांच्या शेतात टाकण्यात येणार आहे. यासाठी शेतकरीही आपले योगदान देणार असुन जमिन सुपिक होणार आहे.

Related Articles

Back to top button