पाचोरा महाविद्यालयात ‘संविधान गौरव महोत्सव’ उत्साहात साजरा

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे भारतीय राज्यघटनेच्या ७५वर्षापूर्ती निमित्त ‘संविधान गौरव महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने आज दि. २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी भडगाव येथील लाडकूबाई विद्यालयाच्या आदर्श शिक्षिका डॉ. सीमा बी. सैंदाणे यांचे ‘भारतीय राज्यघटनेची ओळख’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभहस्ते भित्तीपत्रक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले व राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्त्या डॉ. सीमा बी. सैंदाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील, प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. जयश्री वाघ उपस्थित होते.
डॉ. सीमा बी. सैंदाणे हे भारतीय राज्यघटनेची ओळख या विषयावर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मानवी समाज भटकंती थांबून स्थिर झाला, समूहाने राहू लागला. समूहाने राहत असताना समूहाच्या संरक्षण व कल्याणासाठी काही नियमांची आवश्यकता भासू लागली. ते नियम सुद्धा तत्कालीन काळातील संविधानाचे प्राथमिक रूप असावे असे मत मांडले. भारतीय संविधानाची ओळख करून देत असताना क्रिप्स मिशनपासून तर अलीकडील काळात झालेल्या संविधान दुरुस्ती पर्यंतचा धावता आढावा त्यांनी घेतला. संविधान सभा ही दूरदृष्टीची होती म्हणूनच संविधान सभेने ३९५ कलमे व ८ परिशिष्टाचे संविधान २ वर्षे ११ महिने १८ दिवसात लिहून पूर्ण केले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान तयार झाले. परंतु त्याची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून भारत ‘प्रजासत्ताक’ झाला. ४३ व्या घटनादुरुस्तीची ही सविस्तर माहिती दिली. भारत देश विकासाच्या व महासत्ता बनण्याच्या दिशेने चाललेल्या वाटचालीच्या मुळाशी राज्यघटनेचे योगदान आहे. राज्यघटनेनेच हा विविधतेने नटलेला देश एकसंघ ठेवलेला आहे. सर्वांनी राज्यघटनेचे वाचन करून राज्यघटनेची तत्वे आत्मसात करून घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिरीष बी. पाटील यांनी भारतीय राज्यघटना हा राष्ट्राच्या व समाजाच्या कल्याणाचा मूलाधार आहे. सर्वांनी राज्यघटनेची मूलतत्वे जाणून एक उत्तम नागरिक बनले पाहिजे अशी आशा व्यक्त केली.
‘संविधान गौरव महोत्सवा’निमित्त महाविद्यालयात आयोजित निबंध स्पर्धेत 20, वक्तृत्व स्पर्धेत 6, भिंतीपत्रक स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील निबंध स्पर्धेत प्रथम – कु. गायत्री नाना शिंपी, द्वितीय – कु. मनीषा अनिल सोनवणे, तृतीय – कु. मतीन खलील बागवान, वक्तृत्व स्पर्धेत प्रथम – कु. चेतना रणदीप हिरे, द्वितीय – कु. गायत्री श्रीकृष्ण क्षीरसागर, तृतीय – कु. पौर्णिमा नाना शिंपी तर भित्तीपत्रक स्पर्धेत प्रथम – कु. शिलवंती बन्सीलाल बारेला, द्वितीय – लहू शिवाजी मोरे व तृतीय – कु. आरजू रहीम तडवी या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी डॉ. के. एस. इंगळे, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. माणिक पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. लक्ष्मी गलानी, प्रा. महेंद्र मिस्तरी, प्रा. नितीन पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. किरण पाटील, श्री. नदीम देशमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एस. इंगळे यांनी केले.

Related Articles

Back to top button