पाचोऱ्यातील अनेक एटीएम बंद,शेतकरी व ग्राहकांची तारांबळ ; राष्ट्रीयकृत बँक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Many ATMs in Pachora closed, farmers and customers in distress; Nationalized bank officials indifferent

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी )- शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या तयारीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी त्यांना तातडीने पैशांची आवश्यकता असते मात्र पाचोऱ्यातील बहुतांश एटीएम “नो कॅश” चा फलक लावून बंद आहेत. सहकारी सोसायटींमधील खातेदारांना देखील आपले पैसे काढण्यासाठी बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत, परंतु तिथेही रोखीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत बँक व्यवस्थापकांकडे तोंडी अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु बँकेच्या अधिकाऱ्यां कडून समाधानकारक उत्तरे मिळत नाही. एटीएममध्ये पैसे टाकण्याची जबाबदारी बँकांची आहे, पण कोणीही याकडे गांभीर्याने पाहत नाही, असे शेतकरी आबा पाटील यांनी सांगितले आहे. स्थानिक प्रशासन आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. एटीएम मधील रोखीची नियमित उपलब्धता आणि बँकांमधील व्यवस्थापन सुधारण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर नागरिकांचा त्रास आणखी वाढण्याची भीती आहे.

शेतकरी,नागरिकांची मागणी
शेतकरी आणि नागरिकांनी मागणी केली आहे की, बँकांनी एटीएममध्ये नियमित रोख भरावी आणि शेतकरी तसेच ग्राहकांना पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी. तसेच, बँक अधिकाऱ्यांनी या बाबत स्पष्ट धोरण आखून त्वरित उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे हाल थांबतील .

पत्रकार संघटना आंदोलन करणार
बँक अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी पाचोऱ्यातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा या विरोधात जनहितासाठी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख लक्ष्मण आबा सूर्यवंशी आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button