लातूर:ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा प्रदेश अध्यक्ष शिवाजी कांबळे
आयडियल जनरलिस्ट आसोशीएशन महाराष्ट्र संघटनेकडून मुख्यमंत्र्याकडे मागणी
पत्रकार निखिल वागले
लातूर : राष्ट्र सेवा दलाने ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांसाठी पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करुन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावा यासाठी आयडियल जर्नलिसट आसोशीएशन महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, वरील विषयी निवेदन देण्यात येते की, दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वांभर चौधरी, ॲड.असिम सरोदे हे निर्भय बनो या कार्यक्रमासाठी जात असतांना हल्लेखोरानी अतिशय क्रुरपणे त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीचा चालक वैभव यांनी आपला जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत स्वतःचा व वरील व्यक्तींचा बचाव केला. या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत. त्याचप्रमाणे आयडियल जर्नलिसट आसोशीएशन च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे ही विनंती. असे निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनावर राज्य अध्यक्ष शिवाजी कांबळे महाराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा आदींच्या सह्या आहेत.