Akola:गतिशील विकास, सर्वसामान्यांचा विश्वास हेच ध्येय : सौ. पिंपळे
मातृ शक्ती आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद

महाराष्ट्र अकोला
मोहम्मद जुनैद
काँग्रेसच्या, वंचित आघाडी च्या फसव्या प्रचारापासून मतदारांना सावध करा
अकोला, मार्च : महायुतीच्या तिकीटावर उमेदवार अनुप धोत्रे यांचे जनतेची सेवा हेच लक्ष्य असून, आज विश्वगौरव व राष्ट्रभक्त देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आग्रहावरून लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठीच अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे असे प्रतिपादन सौ नूतन हरीश पिंपळे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीसाठी अकोला मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मा. श्री. भाजपा महिला आघाडीने मोतीरामजी लहाने व गोविंदरावजी आंधळे , विठ्ठलराव सालपिकर व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भूमी आणि अध्यात्म धर्म अध्यात्म सोबत प्रेरणादायी असलेल्या भूमीतून, आयोजित कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख महिला पदाधिकारी यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
यावेळी सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनीकार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने मी भारावून , गेले मातृशक्ती युवाशक्ती जेष्ठ कार्यकर्त्यांचा आशीर्वाद मतदारांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी त्यांची शिल्लदार म्हणून अनुप धोत्रे यांना विजयी करा अशी विनंती सौ. धोत्रे यांनी केली .
कॉंग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टिका करताना मंजुषा सावरकर यांनी कॉंग्रेस हा पक्ष देशभक्तीच्या रुपात आलेला ‘ मायावी राक्षस ’ असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्यासही तो कमी करणार नाही. कॉग्रेसच्या काळातच निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन पहिल्यांदा वापरली गेली होती, हे कॉंग्रेस विसरले असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी निवडून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती उमेदवार येईल असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणूक जिंकण्यासाठी बुथ कार्यकर्त्यांचा वाटा महत्वाचा असून त्यांनी मा. श्री. मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहाचवावे, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे, असे आवाहन बुथ कार्यकर्त्यांना उद्देशून मा सुमन ताई गावंडे यांनी केले. बार्शीटाकळी (दि. २२ मार्च २०२४)
आज बार्शीटाकळी तालुक्याची महिला संवाद सभा संपन्न झाली या बैठकीला सौ सुहासिनीताई संजय धोत्रे, सौ मंजुषाताई रणधीर सावरकर, सौ समीक्षाताई अनुप धोत्रे, सौ नूतनताई हरीश पिंपळे व महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई निकम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मागील दहा वर्षाच्या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजनांचा लाभ माता-भगिनींना झालेला आहे महिला सक्षमीकरणाचा धोरण समोर ठेवून महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मोदी सरकारने मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली तसेच नारी शक्ती वंदन अधिनियम काढत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचं वचनही पूर्ण केलं.
यावेळी बोलताना सुहासिनीताई धोत्रे यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची व उपक्रमांची माहिती उपस्थित महिला मंडळींना दिली. तसेच आगामी काळात मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ आपल्या मतदारसंघातील महिला भगिनींना व्हावा म्हणून आम्ही कार्यरत राहणार आहोत असे वचनही दिले.
यावेळी मंजुषाताई सावरकर,समीक्षाताई धोत्रे,नूतनताई पिंपळे,महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई निकम,महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रुक्मिणीताई खंडारे,महिला मोर्चा बार्शीटाकळी शहर अध्यक्षा पुष्पाताई रत्नपारखी, संगीताताई जाधव,मायाताई मानकर,धनश्रीताई भटकर,मोनालीताई गावंडे,सुमनताई गावंडे, वंदनाताई झळके,छायाताई साबळे,नगरसेविका जयश्रीताई वाटमारे,विद्या धाडवे,विमल वाघमारे,नंदा भुजाडे,शोभा केदारे,योगिता भगत,चंद्रकला उकळकार,मीना वाघमारे,जयश्री केदारे,सविता उखळकर,वर्षा काळे,शिला भुजाडे,ज्योती अग्रवाल,निर्मला गद्रे,मंगला आगाशे,शांताबाई आगाशे,विमल दळावी,रुक्मिणी कळम,गंगा सुरसे,केसर सिद्धांत,रेणुका मरसकोल्हे,उत्कर्ष मेश्राम,मीना हरणे,वनिता काळे,वंदना वाघमारे,सलोनी सकने,संगीता गवळी,पूजा राऊत,ललीता भुजाडे,विजया धांडे,लता आगाशे,सुनिता राऊत,निर्मला ठिकाण, खुशी अडगे,साक्षी शिरसाट,अश्विनी भातकर,हर्षा नेवारे,लिलाबाई कुरळे,रमाबाई नेवारे,उज्वला टेकाम,कीर्ती सुकळीकर,निर्मला मुळतकर,रेखा काकड,वनिता जाणूनकर,शितल काकड,अनिता काकड,सविता काकड,आशा काकड,लता मंगेशकर,प्रमिला राऊत,फरीदाबी शेख इस्माईल,सीमा राऊत, शहनाज परविण,फिरोज खान,अपसाबी शेख जब्बार, फराजाबी शेख रशीद,नजराना फातूम, रेशमा परवीन, ममताजशा करिष्मा परवीन,अजीम शहा,अफसानाबी फीरोजखान, उषा उदयकार,चंदा पतंगे,आशा नेवारे,आशाबी इस्माईल,आसाराम नाटे,बिल्कीसखातून शेख इस्माईल,रैफतउन्निसा शेख लतीफ,नसरीन बानो मोहम्मद जुबेर,शहीदाबी बरकत उल्ला खान,सवीना परविन वसीम खान,जानरा उनिसा जाहिद खान,मंगला सुलतानी,वैशाली केदारे,मिनाक्षी केदारे,रेखा राजूरकर यांच्यासह परिसरातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



