प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचोरा तालुक्याची गरुड झेप

Eagle Leap of Pachora Taluk under Pradhan Mantri Kisan Maha Sanman Nidhi Yojana

आबा सूर्यवंशी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची योजना असून त्यातून दरमहा दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी स्वरूपात मिळतात. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी ई-केवायसी करणे बंधनकारक असते. पाचोरा तालुक्यात एकूण १२९ गावे असून एकूण योजनेची लाभार्थी ३३२४२ एवढे आहेत. त्यापैकी प्रलंबित असलेल्या लाभार्थींना हप्ते नियमित मिळण्यासाठी ई-केवायसी नियमित करून घेण्यासाठी कृषी विभागामार्फत वर्षभर प्रयत्न सुरू होते. तथापि १००टक्के खातेदारांनी ई-केवायसी करुण घेणे अडचणीचे काम होते, अशा परिस्थितीत पाचोरा कृषी विभागाने “कृषी कीर्तन सप्ताहाची” विशेष मोहीम हाती घेऊन तालुक्यातील संपूर्ण गावागावात छोट्या-मोठ्या गाव बैठका, शिवार फेरी, शेतकरी प्रशिक्षण इत्यादी घेऊन तालुका कृषी अधिकारी आर. एन. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायकांनी जनजागृती अभियान राबवून स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करून घेतली. त्याचा दृश्य परिणाम म्हणून तालुक्यात ३९ गावांमध्ये शंभर टक्केवारी पूर्ण करण्याच्या कामात पाचोरा तालुका अव्वल ठरला. कृषी विभागाचे विशेष मोहिमेचे जनमानसातून समाधान व्यक्त होत असून उर्वरित सर्व गावे मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के ई-केवायसी पूर्णत्वच्या मार्गावर आहे असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी श्री.जाधव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button