“कर्तृत्वाचा अमृतस्पर्श” नानासाहेब व्ही.टी.जोशी यांचा आज सन्मान उत्सव
"The nectar of achievement" Nanasaheb V.T. Joshi's honour celebration today
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निखळ योगदान देत उत्तुंग प्रेरणास्थान ठरलेल्या नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा अमृत महोत्सव आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पाचोऱ्यातील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये संपन्न होणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन म्हणून, तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक सह ग्राहक चळवळीत सामाजिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. नानासाहेब जोशी यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते नानासाहेबांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गौरव ग्रंथ प्रकाशनाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. डी. कुळकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासो संजय गरुड आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील, माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ यांची उपस्थिती राहणार आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या जीवन कार्यावर आधारित एक दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. “ज्ञानामृत” या शीर्षकाखाली सादर होणाऱ्या या ग्रंथाचे संपादन नानासो संजय ओंकार वाघ यांच्या मुख्य संपादकत्वाखाली संपन्न झाले आहे. प्रा. सी. एन. चौधरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली असून, प्रा. डॉ. वासुदेव वले आणि महेश कौंडिण्य यांनी सहसंपादक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे.
या भव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष दिलीप ओंकार वाघ, चेअरमन संजय ओंकार वाघ,ॲड.महेश सदाशिवराव देशमुख, तसेच सदस्य दुष्यंतभाई रावल, डॉ. बी.एन.पाटील, खलील देशमुख यांनी केले आहे .