कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची भेट,रामदास पठार या ठिकाणी वृक्ष लागवड व्हावी या विचाराने
कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची भेट, रामदास पठार या ठिकाणी वृक्ष लागवड व्हावी या विचाराने ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र रेनोसे यांनी पाठपुरावा करून जिल्हा परिषदकडे मांगणी केली होती. त्या अनुषंगाने 29.08.2023 रोजी कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जागेची पाहणी करण्यासाठी कृषी पर्वेक्षक दत्तात्रेय नरुटे साहेब, आणि कृषी सहायक प्रमोद पार्टे साहेब. हे दोन अधिकारी गावामध्ये येऊन गावातील सर्व ग्रामस्त यांना लागवड कशी व कोणत्या वृक्षाची करायची याची माहिती दिली. अधिकारी म्हणाले कि तुमच्या शेतात काजू, अंबा, फणस, काजू, बांबू, कोकम,चिकू, साग, पेरु, शेवगा अशी अनेक झाडांची लागवड आपण करु शकता असे अधिकारी म्हणाले.
आपल्या शेतामधील मातीचे नमुने कृषी विभाग अधिकारी घेऊन गेले आहेत.तसेच जो कोणी लागवड करेल त्या व्यक्तीस शेत तलाव साठी 18000 रुपये दिले जातील. व जेवढी झाडे लावाल ती झाडे विनामूल्य दिली जातील असे अधिकारी यांनी सांगितले.
सदर अधिकारी समवेत गावातील श्री हरिश्चन्द्र जाधव, शांताराम धनावडे, संपत नलावडे, नामदेव जाधव, शिवराम धनावडे, सुरेश नलावडे, दशरथ पवार,सौ सुशीला (अक्का )पवार आणि सदस्य रामचंद्र रेनोसे उपस्थित होते.सर्व अधिकारी व जमलेल्या ग्रामस्थ यांचे रामचंद्र रेनोसे यांनी आभार मानले.जर कोणाला झाडे किंवा शेत तलाव पाहिजे असल्यास आजच रेनोसे साहेब यांना संपर्क करावा.
पत्रकार = प्रकाश कृष्णा नलावडे