श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

Mister. National Science Day celebrated with enthusiasm at Sheth Muralidharji Mansingka Literature, Science and Commerce College, Pachora.

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विज्ञान मंडळातर्फे २८ फेब्रुवारी हा दिवस सी. वी.रमन यांना नोबल प्राइज मिळाल्याबद्दल ‘ राष्ट्रीय विज्ञान दिवस ‘ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. डॉ. जे. व्ही. पाटील , तर प्रमुख वक्ते सौ. रजिनी ताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान ता. भडगाव जि. जळगाव येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. शेलार हे होते. प्राचार्य डॉ. शिरीष पाटील , विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस.टी. सूर्यवंशी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शरद बी. पाटील यावेळी विचार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. शेलार सर यांनी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्ट्या कशा प्रकारे निर्माण करण्यात येईल, विज्ञानाबद्दल असणारी जिज्ञासा विषद केली .वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची आणि कृती करण्याची एक पद्धत जी तथ्ये, पुरावे आणि तर्कसंगत विश्लेषणावर आधारित असते. अंधश्रद्धा, पूर्वग्रह आणि भावनांऐवजी वस्तुनिष्ठता आणि तर्कशुद्धतेवर भर दिला जातो.वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे घटक: वैज्ञानिक दृष्टिकोनात प्रत्येक गोष्टीची तर्कशुद्धतेच्या आधारे तपासणी केली जाते. यात वैयक्तिक भावना आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्यांवर लक्ष केंद्रित केले जाते.वैज्ञानिक दृष्टिकोनात कोणत्याही दाव्याला सिद्ध करण्यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असते.
यामध्ये प्रयोग आणि निरीक्षणांच्या माध्यमातून निष्कर्ष काढले जातात.याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉ. जे. व्ही. पाटील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनात प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारला जातो आणि टीकात्मक विचार करण्यास प्रोत्साहन दिले जाते.नवीन कल्पना आणि पुराव्यांसाठी खुले असणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे सांगितले .याप्रसंगी द्वितीय व तृतीय विज्ञान विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण माहिती ही पावर पॉइंट प्रेझेंटेशन ने सादर केली. याप्रसंगी डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. प्रदीप रुद्रसवाड, प्रा.कोरडे मॅडम, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. जयश्री वाघ, प्रा. सुनील पाटील, श्री गोपाल चौधरी, श्री बी.जे. पवार, श्री तांबे व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी IQAC समन्वयक प्राध्यापक डॉ. शरद भीमराव पाटील यांचा संशोधनात विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल पाटील, प्रास्ताविक प्रा. एस. टी. सूर्यवंशी व आभार प्रा. अमित गायकवाड यांनी केले.

Related Articles

Back to top button